HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी भिडेंना महाराष्ट्रातून तडीपार करा, सचिन खरातांचा घणाघात!

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली. “संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. इतकंच नाही तर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा. असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”, असं खरात म्हणाले.सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. संभाजी भिडे यांनी आज सांगलीत बोलताना कोरोना वगैरे सगळं थोतांड असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुन सचिन खरात यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

संंभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. इतकंच नाही तर वारकरी रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

वारी झाली असती तर कोरोना दिसला नसता –

या कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल,तर लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वारीला जर बंदी घातली नसती,तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की, कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.

पुढारी लोक काय लायकीचे?

संभाजी भिडे यांनी देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे. निव्वळ थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही, लॉकडाऊनमुळे जेवढं वाटोळं झालंय. सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय, पुढारी लोक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे. एकजात सर्वजण स्वार्थी आहेत असं संभाजी भिडे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील; निती आयोगाने सहकार्य करावे! – मुख्यमंत्री

Aprna

सायन रुग्णालय आंदोलन प्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

News Desk

“मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”

News Desk