HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुंबई दुर्घटनेत भिंत कोसळ्ल्यामुळे २१ जणांचा मृत्यू’, केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर!

मुंबई | गेल्या काही तासांपासून मुबंईत मुसळधार पाऊसाने अक्षरशः थैमान घातलं असून नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय मुंबई तुंबली असून भिंत पडण्यासारख्या दुर्घटना देखील घडल्या आहेत. रविवारची सकाळ मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे, विक्रोळी, चेंबूरमध्ये भिंत कोसळ्यामुळे आतापर्यंत २१जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अद्यापही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे तर पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे.

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून २ लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा राज्याने केली. राज्य आणि केंद्र सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मदत जाहीर केली.

काय घडलं नेमकं?

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली. सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, १५ जणांचा मृत्यू झाला होता. संध्याकाळपर्यंत हा आकडा २१ वर पोहोचला. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री १२: ३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली

दरम्यान, विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ते नवीन उगवलेलं गवत आहेत’, विजय वडेट्टीवारांची गोपीचंद पडळकरांवर टीका

News Desk

‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार

News Desk

आरोग्य विभागाच्या भरती, खुल्या किंवा ‘ईडब्ल्यूएस’तून एसईबीसीची पदे भरली जाणार

News Desk