HW News Marathi
महाराष्ट्र

वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मुंबई – गोवा महामार्गालाही बसला फटका…!

रत्नागिरी। गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने कहर केलाय त्यातच आता चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. आता पूर ओसरल्याने चिपळूणमध्ये जागोजागी एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच या पावसाचा फटका मुंबई – गोवा महामार्गालाही बसला आहे. चिपळूण येथे वाशिष्ठी पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

चिपळूणला महापुराचा विळखा

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती भयानक झाली आहे. चिपळूणला महापुराचा विळखा बसला होता. संपूर्ण पाण्याने वेढले गेले आहे. हजारो लोक पुरात अडकले होते. एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद

गेल्या चार दिवसापासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या रंगाच रांगा लागल्या आहेत. चिपळूणचा वाशिष्टी पूल खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कुंभार्ली घाट आणि आंबा घाटावर देखील दरड कोसळत असल्यामुळे येथील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.

ट्रक चाललकांचे खाण्या-पिण्याचे देखील हाल

तर सिंधुदुर्गातील आंबोली घाट देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे अवजड वाहन थांबून ठेवण्यात आली आहेत. चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ट्रक चाललकांचे खाण्या-पिण्याचे देखील हाल झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करेल !

News Desk

“पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल”, अजित पवारांचा खोचक टोला

News Desk

महाराष्ट्रात कोविड-१९ चे सर्व निर्बंध संपुष्टात; आज मध्यरात्रीपासून निर्बंध शिथिल

News Desk