HW News Marathi
महाराष्ट्र

लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन!

चिपळूण। पुरामुळे ज्यांचं शेती, घरदार आणि दुकानाचं नुकसान झालं आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन दिवसात अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल, असं सांगतानाच लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिलं.

लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत उद्या दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र त्यांचा दौरा असणार आहे तर प्रत्येक ठिकाणी तात्काळ मदत केली जाईल असं दुर्घटनाग्रस्त नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले तर लोकांना बरं वाटेल म्हणून मी मदतीची घोषणा करणार नाही, कोणालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांचा अंदाज घेऊनच सरकार मदत करेल आणि आम्ही सगळेच तुमच्या पाठीशी आहोत असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

विमा असेल नसेल मदत करा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना असे देखील म्हणाले दुर्घटनाग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत करण्याचा प्रयत्न असेल आणि ज्यांच्याकडे विमा आहे त्यांना मदत करा आणि नसेल तरीही मदत करा असे देखील म्हणाले अर्थव्यवस्था सध्या मंदावली आहे आणि सरकारची देखील अर्थव्यवस्था मंदावली आहे तर सगळ्यात आधी केंद्राकडे मागणी करणार नाही पश्चिम महाराष्ट्राची मागणी केल्यानंतरच केंद्राकडे मागणी करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे

तर चिपळूणच्या दौर्यावर असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेदेखील म्हणालेत आज पर्यंत मी हवामान बदलांबद्दल ऐकत आलोय मात्र आता चटके पाहायला मिळतात आणि ही सगळी परिस्थिती, वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे असे देखील ते म्हणाले. तर वर्षानुवर्षे बसलेल्या गावांवर दरडी कोसळत आहे आणि आता पाऊस देखील मी अनुभवला तो पाउस नाही तर अतिवृष्टी भयानक याला म्हणता येईल असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले.

मी आता घोषणा करत नाही

दरवर्षी पावसाळ्यात कोणत्या ना कोणत्या भागात चक्रीवादळ महापूर आणि अशा अनेक प्रकारे विध्वंस होत असतात अक्की गावच्या गाव गाडली जातात अनेक परिवार उद्ध्वस्त होतात असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण दौऱ्यावर असताना म्हणाले. मी आता घोषणा करत नाही कारण फक्त चिपळूननच नाही तर सगळ्यांचा अंदाज घ्यायचा बाकी आहे.

पूर येणारच नाही असं व्यवस्थापन करू

पाणी अचानक कसं भरलं. पूर का आला याचा आढावा घेण्यात आला आहे. पाणी, पूर तुम्हाला काही नवीन नाही हे मला कुणी तरी सांगितलं. यंदा पूर मोठ्याप्रमाणावर आला. कारण पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. त्यामुळे या पुराचं जलव्यवस्थापन करावं लागेल. तुमच्याकडे पूर येऊच नये तसं व्यवस्थापन करावं लागेल. पण त्याला थोडा अवधी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांप्रमाणे कर्ज द्या

यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरच्या दीक्षा भूमीवर आणि महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नका – रामदास आठवले

News Desk

भंडाऱ्याच्या घटनेची योग्य चौकशी करुन सरकार दोषींवर कारवाई करेल, रोहित पवारांचा विश्वास

News Desk

अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की, पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही | हसन मुश्रीफ

News Desk