HW News Marathi
महाराष्ट्र

“… आणि भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री साहेब तुम्ही हात जोडू नका!”

रत्नागिरी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड दौऱ्यानंतर आता आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमच्यावर कर्ज आहे

यावेळी एका व्यापाऱ्याने मुख्यमंत्र्यांसमोर सर्व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. पूर आला. त्यात आमचं मोठं नुकसान झालं. आमच्यावर कर्ज आहे. आम्हाला शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. व्यापाऱ्यांना आयुष्यात एकदाच कर्जमाफी द्या. त्यानंतर आम्हाला दोन टक्क्याने कर्ज द्या. नंतर आम्ही सरकारकडे कधीही भीक मागणार नाही. तुम्हीच आमचे आईवडील आहात, आम्हाला जगवा, असा टाहोच एका व्यापाऱ्याने फोडला. त्यावर तुमच्या समस्यांवर मार्ग काढू असं मुख्यमंत्री म्हणाले.

महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिल.

काहीही करा, पण मदत करा

मुख्यमंत्र्यांची व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच एका महिलेने थेट मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडला. ही महिला प्रचंड रडत होती. माझ्या घराच्या छतापर्यंत पाणी गेलं. होतं नव्हतं. सर्व गेलं. तुम्ही काहीही करा पण आम्हाला मदत करा. साहेब, तुम्हीच मदत करू शकता. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो, असं ही महिला मोठमोठ्याने रडत सांगत होती. काही पण करा, आमदार, खासदाराचा दोन महिन्याचा पगार फिरवा, असा टाहोही या महिलेने फोडला. मुख्यमंत्र्यांनीही थांबून या महिलेसमोर हात जोडत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीये दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली. आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता फिरत आहेत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली.केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज तळीये दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली. आता कुठे त्यांना घरातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता फिरत आहेत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत – पृथ्वीराज चव्हाण

News Desk

मेहबूब शेख प्रकरण तपासासाठी महिला अधिकाऱ्याकडे सोपवा, नीलम गोऱ्हेंची मागणी

News Desk

…म्हणून नारायण राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk