Site icon HW News Marathi

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई । राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ (NDRF) व  एसडीआरएफच्या (SDRF) 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण 13 पथके तैनात आहेत.

नांदेड – 1, गडचिरोली – 2, भंडारा – 1, अशा एकूण चार राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ)  पथके तैनात करण्यात आली आहेत.

राज्यातील नुकसानीबाबतची सद्यस्थिती

राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे व 351 गावे प्रभावित झाली असून 117 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून 20 हजार 866 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 124 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर 243 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 3 हजार 534 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून काल सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.

Exit mobile version