HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात २० एप्रिलपासून सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडक उद्योग सुरु होणार

मुंबई | कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, २० एप्रिलपासून काही भागातील लॉकडाऊन हा शिथिल करण्यात येणार आहे. काही उद्योगधंदे, व्यापार जरी सुरु झाले तरी सण, सार्वजनिक वाहतूक, जाहीर कार्यक्रम या सगळ्यांवर बंदीच असणार आहे.

दरम्यान, नागरिकांना आरोग्य सेवा मिळाव्यात, शेतीची, मगशेतीची कामे व्हावी आणि मुख्य म्हणजे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील सरकारने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच, २० एप्रिलपासून काही निर्णयाची अमंलबजालणी होईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

तसेच, राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांचे आरोप गंभीर, चौकशी करा!; नाना पटोलेंची मागणी

Aprna

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

News Desk

दानवेंच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मदतीला पवारांचा हात

Adil