HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांमध्ये अडीच लाख पदे रिक्त

मुंबई | शासनाच्या विविध विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये सुमारे २ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्ती झाल्यानंतर नोकर भरती न केल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहेत. दरवर्षी किमान ५० हजार सरकारी कर्मचारी सेवा निवृत्त होतात. विविध विभागांमध्ये ६ लाख ९६ हजार ४१५ पदे रिक्त आहेत. तर जिल्हा परिषदेतील पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. परंतु कित्येक वर्षांपासून मंजूर पदे भरण्यात आलेली नाहीत.

१९८९-९९ या काळामध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणलेल्या झिरो बजेटमुळे राज्यातील नोकर भरतीवर परिणाम झाला. त्यामुळे बेकारीचे प्रमाण वाढ गेले आहे. सर्वाधिक पदे गृह विभागात रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक व पर्यावरण विभागाने आपली मंजूर पदे भरली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये किमान १ लाख कर्मचारी निवृत्त झाले असून ही पदे भरण्यात आलेली नाहीत. अनेकदा मागणी करून सुद्धा शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. अशी खंत महाराष्ट्र शासनाने व्यक्त केली.

रिक्त पदे असलेली विभाग

  • मराठी विभाग – २१४ पदे
  • शासनाच्या सर्व विभागातील – १ लाख ३० हजार ५१
  • जिल्हा परिषदातील -२६ हजार ६९८ पदे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटील यांचे दावे म्हणजे फक्त बोलण्याच्या गोष्टी !

News Desk

शरद पवारांना ब्रीच कँडीमधून डिस्चार्ज, तब्येत उत्तम 

News Desk

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक’,लॉकडाऊन उठवण्याबाबत हालचाली सुरु?

News Desk