HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात काल 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

मुंबई। कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ- उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 401 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 88 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. राज्यात आज 39 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 593 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (18), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (44), परभणी (80), हिंगोली (15), नांदेड (08), अकोला (22), वाशिम (08), बुलढाणा (25), यवतमाळ (09), वर्धा (8), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

राज्यात किती आहे रुग्णसंख्या

राज्यात सध्या 33 हजार 159 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,40,052 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,338 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 94, 69, 053 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,64, 915 (11.04टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण ठिक झाले

देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 346 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात 209 दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल (सोमवारी) 29 हजार 639 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 52 हजार 902 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 38 लाख 53 हजार 48 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 49 हजार 260 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 50 हजार 886 रुग्ण ठिक झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कोथळा काढायला दंडात ताकद आहे का?”, चंद्रकांत पाटलांचा पलटवार

News Desk

“हिंमत असेल तर अफगाणिस्तानला जा”, अतुल भातखळकरांचा जावेद अख्तरांना आव्हान

News Desk

‘सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ नाना पटोलेंचा राऊतांवर पलटवार

News Desk