HW News Marathi
Covid-19

राज्यात आज २७०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर ८१ रुग्णांचा मृत्यू

मुंबई। राज्यात आज कोरोनाच्या २ हजार ७०१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज (१६जून) राज्यात १ हजार ८०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ५७ हजार ८५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १३ हजार ४४५ इतकी झाली आहे. यापैकी ५० हजार ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात ५ लाख ८६ हजार ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.

आज नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार

News Desk

सोशीअल डिस्टसिंगचे पालन करत के.ई.एम. रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

News Desk

राज्यात १ सप्टेंबरनंतर काय? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले

News Desk