HW News Marathi
महाराष्ट्र

एकाच दिवशी आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

औरंगाबाद | मराठवाड्यात आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गंगापूर तालुक्यातील पाडळसा येथील राम सोपान सोनवणे (३३), पैठण तालुक्यातील आडूळ खुर्दचे सूर्यभान हरिभाऊ भावले (४०) आणि कन्नड तालुक्यातील आडगाव येथील जुहुरचे अनिल केरुजी सोनावणे (३४) या तीघांनी आत्महत्या केली असून कोणी शेतीसाठी पैसे घेतले, कपसाचे पीक पूर्णपणे उद्धवस्त झाले म्हणून तर कोणी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने कारणामुळे औरंगाबाद मधील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

तर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील होळ येथील आबासाहेब शिंदे(४४), परळी तालुक्यातील सिरसाळा गावात एकनाथ गंगाराम चव्हाण (४५) या शेतकऱ्यांनी ग्रामीण बँकेतून कर्ज घेतले म्हणून आत्महत्या केली. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. साहेबराव एकनाथ मिचके (६५) या शेतकऱ्यांनी जाफराबाद पोलिस ठाण्यात विष प्राशन करुन आत्महत्या केली. तर जाफराबाद मधील अजून एक आत्महत्याची घटना घडली. यात आसाराम नंदू पवार(५०) यांनी विहिरीत उडी मारुन जीवन संपविले. जालना तालुक्यातील बाबर पोखरी येथील दिलीप दत्तू पवार (२९) या तरुण शेतकऱ्यांनी कर्ज आणि नापीकीमुळे आत्महत्या करण्याचे पाऊल उचलेल्याचे कळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई दुर्घटनेत भिंत कोसळ्ल्यामुळे २१ जणांचा मृत्यू’, केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत जाहीर!

News Desk

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार

News Desk

एकरकमी FRP द्या, अन्यथा चारचौघात बेइज्जत करू ! राजू शेट्टींचा इशारा

News Desk