HW News Marathi
महाराष्ट्र

ST संपात फूट; काल ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर परतलं, महामंडळाची माहिती

मुंबई | राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केले. यानंतर एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेताला होता. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्या, उद्यापर्यंत कामावर हजर व्हा, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल (२५ नोव्हेंबर) केले होते. आज सकाळपर्यंत कर्मचारी कामावर येण्याची वाट पाहू, मग कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील परबांनी काल माध्यमांशी बोलताना दिला होता.

दरम्यान, एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल ९ हजार ७०५ कर्मचारी कामावर परतले असून काल ४५७ एसटी रवाना झाली होती. यानंतर औरंगाबाद, रत्नागिरी आणि सातारा कर्मचारी कामावर रूज झाले असून भंडारा, वसई आगरातून बस रवाना झाले आहेत. तसेच काल ११ हजार १८८ प्रवाशांनी एसटीतून प्रवास देखील केला आहे. सरकारच्या परगावाढीनंतर राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहे. दुसऱ्या बाजुला मुंबई, नाशिक आणि रत्नागिरीतील एसटी आगरात शुशकाट आहे.

तुटेपर्यंत ताणू नये – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन तुटेपर्यंत ताणू नये. त्यानंतर परत जोडता येणार नाही, असे सूचक विधान केले आहे. एसटीचे विलीनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट असून मुंबई उच्च न्यायालय विलीनीकरणाचा जो निर्णय येईल, तो आम्ही मान्य करू, असेही परब म्हणाले. तर एसटीच्या संपामुळे जनतेला त्रास होत आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नका, असे पुन्हा एकदा आवाहन परबांनी केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढीच्या महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

Aprna

मनसेच्या नव्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

swarit

माझ्या शिवसेना प्रवेशाच्या बातम्या म्हणजे केवळ अफवाच !

News Desk