HW News Marathi
महाराष्ट्र

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली! जयंत पाटलांनी चक्काजाम आंदोलनाची उडवली खिल्ली…

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी भाजपकडून आज सकाळपासून चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच महाराष्ट्रात विविध ठिकाणी भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलनं सुरू आहेत. अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या आंंदोलनावरुन विरोधकांना सणसणीत टिका केलीये.

भाजपचे आजचे आंदोलन म्हणजे, ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ अस ट्वीट करत जयंत पाटील यांनी आज चालू असलेल्या चक्का जाम आंदोलनाची खिल्ली उडवली आहे.जयंत पाटील म्हणाले की, राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे.

मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर देखील भाजपच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. परंतू, काही वेळातच पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन हे आंदोलन होऊ दिलं नाही. यावेळी प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

तसेच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरातून नेतृत्व करत आहेत. तर, रावसाहेब दानवे जालन्यातून आंदोलन करत आहेत.

चंद्रकांत पाटलांचा एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

फडणवीसांना घेतलं ताब्यात

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली .तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना

ताब्यात घेतलं.मी यावेळी फडणवीस म्हणाले,सर्व ओबीसी नेत्यांना आव्हान करतो, तुमची आमची दुश्मनी नाही, तुम्ही कुठल्याही पक्षात असाल, पण ओबीसीप्रती इमानदार असाल, तरी आम्ही तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे, राजकारणाशिवाय तुमच्यासोबत उभं राहायलं तयार आहेमी दाव्याने सांगतो पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो,खऱ्या अर्थाने आमच्या हाती सूत्र दिलीत तर, मी दाव्याने सांगतो ओबीसीचं राजकीय आरक्षण परत आणू शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अदिती चांगलं काम करतेय, ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो”- अजित पवार

News Desk

मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, नाना पटोले भडकले

News Desk

संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते ! शिवसेना प्रवक्त्यांची यादी पाहा

News Desk