HW News Marathi
महाराष्ट्र

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

मुंबई | अनेक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत ५ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा ९ जणांचा यात समावेश आहे.

या समितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री उद्योग अदिती तटकरे, राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम दत्तात्रय भरणे हे सर्व सदस्य आहेत. प्रधान सचिव आणि मुख्य राजशिष्टाचार अधिकारी यांची ही या समितीत सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पद्म पुरस्कार हा भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक मानला जातो. दरवर्षी २६ जानेवारीला हे पुरस्कार जाहीर केले जातात. राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेली सनद आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. भारत सरकारने १९५४ साली भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार देण्याचे ठरवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ ट्वीटमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

swarit

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाही, ठाकरे सरकार निर्णयावर कायम – उदय सामंत

News Desk