HW News Marathi
महाराष्ट्र

“चेहरा भोळा आणि भानगडी सोळा” ठाकरे सरकारवर टीका

मुंबई | राज्यातील विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये वारंवार आरोपांची मालिका पाहायला मिळते सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून एकमेकांवर टीका होत असते. भाजप नेते आणि आमदार अशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

‘चेहरा भोळा आणि भानगडी सोळा’, असं हे सरकार आहे, असं म्हणत अशिष शेलार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज भाजप पक्षाची कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यावेळी अशिष शेलार बोलत होते. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसऱ्या पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेलं आणि तिसऱ्याने आमचा विश्वासघात केला, असं हे सरकार आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत बोलताना आशिष शेलार यांनी, मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितलं की, मला पूर्णपणे बाजू मांडण्यास सरकारने मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की, हा ठरवून केलेला कट होता. सरकारने याच आता उत्तर द्यायला हवं, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मतानं, महाराष्ट्राचं नेतृत्व कुणी केलं पाहिजे हे आधीच स्पष्ट केलं होतं. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथं अहंकाराचं सरकारच नव्हतं, असंही शेलार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका – उदयनराजे भोसले

News Desk

आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना लाख रुपयाचे धनादेश वाटप 

News Desk

कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल! – जितेंद्र आव्हाड

Aprna