HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या राजीनाम्याच्या केवळ पुड्या सोडल्या!

औरंगाबाद | “राजीनाम्याच्या पुड्या ज्यांनी सोडल्या त्यांनाच त्याबाबत विचारा, मी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या मातोश्रीवर जाऊन चर्चा केल्यानंतरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि उद्धव ठाकरेंकडे माझी भूमिका मांडणार आहे” अशी माहिती शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

काही वेळापूर्वीच “अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही. सत्तार यांची नाराजी दूर झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांना उद्या (५ जानेवारी) मातोश्रीवर भेटायला बोलावले आहे”, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची भेट घेतल्यानंतर आता माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिली आहे.

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून येत मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले तर, औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच नाराजीने सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन, जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल ! नाना पटोलेंचा घणाघात

News Desk

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

News Desk