HW News Marathi
महाराष्ट्र

धुळ्याहून निघालेली पपईची गाडी उलटली, अपघातात १५ मजुरांचा झाला मृत्यु

यावल । पपई भरून येणारी आयशर यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मृत पावलेले सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केर्‍हाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.

अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठले असून त्यांनी अपघातातील मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर अभिनेत्री दिपाली सय्यदचे उपोषण मागे …

Arati More

कीटकनाशक व्यवस्थापन कायदा -२०१७ तात्काळ अस्तित्वात आणा -महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनची मागणी

News Desk

मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या महिलेची साता-यात आत्महत्या

News Desk