HW News Marathi
क्राइम

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

अहमदनगर | अहमदनगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे ट्रक आणि स्कॉर्पिओमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे (वय ७०), रमेश भाऊसाहेब कातोरे (५१), बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०), दगडू आनंदा भांगे (वय ५०) आणि हनुमान अंबादास दुसे या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा जखमी झाला असून त्याच्यावर जामखेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुक्यातील रहिवासी असून आषाढी वारीनिमित्ताने पंढरपुला गेले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेने येत असताना अहमदनगर-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावती जिल्ह्यातील शाळेत भिंत कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

News Desk

बायकोच्या लफडेबाजाली कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

News Desk

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई विभागातून सर्वाधिक म्हणजे 615 मुलांची केली सुटका

Aprna