HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा नाराजी, काँग्रेस नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र तर सोनिया गांधींचीही घेणार भेट

मुंबई | महाविकासआघाडीमध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सुर आवाळला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक निधी मिळाल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. तर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसला डावले जात असल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, तसेच काँग्रेसचे २५ नेते महाविकासआघाडीवर नाराज असून त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नुकतेच शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी एक सभेदरम्यान शिवसेना सत्तेत असून देखील दुय्यम वागणूक दिल्याचे बोलून दाखविले. यामुळे आता महाविकासआघाडी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त नीधी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

तानाजी सावंत म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यात सत्तेची फळे चाखत असून हे दोन्ही पक्ष शिवसेनेला लाचारीसारखे वागणूक देत आहेत. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेचा केवळ अपमान झाला. यामुळे साहेबांनी विचार करायला हवा,” असे म्हणत त्यांनी मनातील खंत व्यक्त केली. येत्या काळात महाविकासआघाडीत स्फोट होणार असे केंद्रीय मंत्री रावसाहेब तानवे म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MIM सोबत जाण्याच्या निर्णयावर शरद पवार म्हणाले…

Aprna

दानवेंच्या दावणीला महावितरण, साडेसात वर्षांपासून वीज बिल भरलेच नाही

News Desk

नीलम गोऱ्हेंनी मुख्यमंत्र्यांना दिले 4 महत्वाचे सल्ले!

News Desk