HW News Marathi
महाराष्ट्र

मला स्थानिक नेत्यांची अपेक्षित मदत मिळाली नाही !

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभेत झालेल्या आपल्या पराभवाचे खापर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर फोडले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांचा सामना भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याशी झाला. उर्मिला मातोंडकर यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून आपल्याला अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

“मी ही निवडणूक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, कष्ट घेतले. मात्र, मला पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित मदत मिळाली नाही”, असे उर्मिला यांनी आपल्या पत्रात म्हटल्याची माहिती मिळते. उर्मिला यांनी आपल्या पराभवास थेट प्रचार चीफ कॉर्डिनेटर संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, अशोक सुत्राले यांना जबाबदार धरले आहे.त्याचप्रमाणे या पत्रात उर्मिला यांनी चुकीचे नियोजन, स्थानिक नेत्यांची पात्रता, आर्थिक मदतीतील कमतरता अशाही अनेक बाबींचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे.

लोकसभेत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. मिलिंद देवरा यांनी देखील आपल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा सोपविला आहे. दरम्यान, एकीकडे पक्षात हे राजीनामा सत्र सुरू असताना आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस वाढल्याचे देखील चित्र दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेंद्र मोदींच्या फाळणी वेदना स्मृती दिनावरून शिवसेनेची टीका!

News Desk

शेतीतलं शिवसेनेला काय कळतं? शेती हा शिवसेनेचा विषय नाही, निलेश राणेंचा प्रहार 

News Desk

नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा.. शिवसेना तोंडघशी पडल्याची टीका

News Desk