HW News Marathi
महाराष्ट्र

गुजरात, कर्नाटक, उत्तराखंडनंतर भाजप आणखी एक मुख्यमंत्री बदलणार!

नवी दिल्ली। आसाम, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातनंतर आता आणखी एका राज्याचे मुख्यमंत्री भाजप नेतृत्व बदलणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कारण हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना भाजप नेतृत्वाने दिल्लीला बोलावलं आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनाही बोलावलं आहे. यामुळे हिमाचल प्रदेशातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण रविवारीच मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे दिल्लीहून परतले. तर काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री बदलण्यात आल्याने हिमाचल प्रदेशातही राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आलं

2 दिवसांआधीच ते दिल्लीहून शिमल्याला परतले होते. दिल्लीत त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीला बोलवण्यामागे गुजरात पॅटर्न असल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी पोटनिवडणुकीबाबत चर्चा

दिल्लीत भाजप नेतृत्वासोबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, आणि या बैठकीला भाजपचे हिमाचल प्रदेशचे प्रभारी अविनाश राय खन्ना, संजय टंडन, संघटनमंत्री पवन राणा आणि हिमाचल प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप उपस्थित होते.या बैठकीत राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

भाजपकडून या सर्व गोष्टींचं खंडन

हिमाचलचे मुख्यमंत्री बदलासाठीच त्यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, भाजपकडून या सर्व गोष्टींचं खंडन करण्यात आलं आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, हे आधीच घोषित झालं आहे की 2022 च्या विधानसभा निवडणुका, भाजप जयराम यांच्याच नेतृत्त्वात लढणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या चर्चांमध्ये दम नसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं या मागचं कारण

गुजरात, कर्नाटक, उत्तराखंड आणि आसाममधील मुख्यमंत्री भाजपने एकामागून एक बदलले. आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं या मागचं कारण म्हणजे त्यांना हटवण्यात येणार आहे, असं काँग्रेस नेत्याने म्हटलंय. कुल्लूमधील ढालपूर मैदानात जन आक्रोश सभेत काँग्रेस आमदार विक्रमादित्य यांनी यांनी टीका केली. कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड आणि आसाम प्रमाणे आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्रीमंत्री रात्रीत बदलू शकतात, असा टोला विक्रमादित्य यांनी लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य! – मुख्यमंत्री

Aprna

भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून प्रयत्न…

swarit

पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी अमित देशमुख यांच्यासह सतेज पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा

News Desk