HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंनंतर अनिल देशमुख आणि परमवीर सिंग यांचीही हकालपट्टी करा ! | किरीट सोमय्या

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणाने काहीच दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, याच प्रकरणी आरोप झालेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर शनिवारी (१३ मार्च) रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी NIA कडून अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान आता सचिन वाझेंच्या या अटकेनंतर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने पुन्हा महाविकासआघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. “महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. किरीट सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाले कि, “अखेर सचिन वाझेंनी अटक झाली. मात्र, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनाही जाब विचारावाच लागणार आहे. त्याचप्रमाणे, आता शिवसेनेचे प्रवक्ता ओसामा सचिन वाझेंसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके काय सांगणार ? अजून काय काय बाहेर येणार ते देखील पाहायला हवे”, असे किरीट सोमय्या म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची शासनाची तयारी! – अजित पवार

Aprna

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

News Desk

युजीसीच्या परीक्षांच्या निर्णयावरून वरुण सरदेसाई आणि आशिष शेलार आमने-सामने

News Desk