HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी वाहिली भावूक श्रद्धांजली

मुंबई | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे काल (४ जानेवारी) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनानंतर सर्व स्तरांतून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, “डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी स्मरणात राहिल. सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक अनाथ मुलांना चांगल्या दर्जाचे जीवन दिले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले.  त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती…!” त्यासोबत मोदींनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. 

सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज (५ जानेवारी) दुपारी १२ वाजता पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अवघ्या महिन्याभरापूर्वी सिंधुताईंवर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७४ वर्षी निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे. सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात होते.

https://twitter.com/narendramodi/status/1478552510579101696?s=२०

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाहिली श्रद्धांजली

‘सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकार-राज्यपाल वाद पुन्हा नव्या विषयावरुन पेटला, राज्यपालांना सरकारी विमान नाकारलं

News Desk

महाराष्ट्र हे आता आत्महत्येचं डेस्टिनेशन होतंय का?, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंवर शरसंधान

News Desk

कारशेड आरे कॉलनीतून दुसरीकडे नेण्याचा निर्णय पुर्णपणे चुकीचा – देवेंद्र फडणवीस

News Desk