HW News Marathi
महाराष्ट्र

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर लागणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. मुनगंटीवार कायमच महाविकासआघाडीचं सरकार पडणार असा दावा करत असतात.अधिवेशनातही त्यांनी तो दावा केला आहे. तर पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

“राज्यात शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढतं, तेव्हा सत्तेचा प्रलय येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे,” असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

“शुभकार्य कधी ना कधी व्हायचंच आहे. जनहित विरोधी सरकार, अधिवेशन घ्यायचं नाही. जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षभरात ११६ तास ३९ मिनिटे अधिवेशन झालं. यावेळी ४७ तास अधिवेशन झालं. शेकडो प्रश्न कोरोना काळात तयार झाले. असाधारण परिस्थिती होते. अशापरिस्थितीही फक्त सुडाचे राजकारण सुरु आहे,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’; भाजप आक्रमक तर पटोलेंनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

News Desk

आरोग्य विभागात २५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

swarit

काँग्रेसमुक्त भारताची घोषणा करीत होते, पण अनेक राज्येच भाजपमुक्त झाली !

News Desk