HW News Marathi
महाराष्ट्र

हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलूनच दाखवा! – इम्तियाज जलील

मुंबई । औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. “हिंमत असेल तर शहराचं नाव बदलूनच दाखवा”, असं थेट आव्हान आता जलील यांनी दिलं आहे. राज्य सरकारच्या एका परिपत्रकात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आल्याने हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. यावरून, औरंगाबादच्या नामांतराचा हा मुद्दा आता नवं आक्रमक वळण घेण्याची शक्यता आहे.

“हिंमत असेल तर औरंगाबाद शहराचं नाव बदलूनच दाखवा. त्याचप्रमाणे, ज्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचं हे परिपत्रक काढलं त्यांनी राजीनामा द्यावा”, अशी थेट मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे. औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून एकीकडे शिवसेना आणि भाजपसारखे पक्ष आक्रमक असताना काँग्रेस या मागणीच्या विरोधात आहे. फक्त शहराचं नाव बदलण्याऐवजी शहरातील पायाभूत सुविधांचा विकास होणं अधिक महत्त्वाचं असल्याची काँग्रेसची भूमिका आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही संभाजीनगर उल्लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर देखील यापूर्वी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरुन राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. “सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे”, असं थोरात म्हणाले होते. तर हा विषयावर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मान्यता

Aprna

वीज कनेक्शन तोडी विरोधात राज्यभर भाजपचे टाळे ठोको आंदोलन

News Desk

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल – देवेंद्र फडणवीस

News Desk