HW News Marathi
महाराष्ट्र

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मोठा दिलासा, चौकशी तूर्तास बंद

मुंबई | नुकतेच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जवळपास ४८ तासांनी त्यांच्यावरील तब्बल ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळाप्रकरणातील ९ फाईल्स लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) याबाबातचे पत्र आमरावती एसीबी पोलीस अधिक्षकांना पाठविण्यात आले आहे. या पत्रात नमुद केल्यानुसार, त्या ९ प्रकरणांच्या फाईल्स तूर्तास बंद करण्यात आल्या असून सरकार अथवा न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशी मागणी केल्या पुन्हा एकदा यांची चौकशी करण्यात येईल.

 

दरम्यान, आज (२५ नोव्हेंबर) बंद झालेल्या सिंचिन घोटाळ्यातील त्या प्रकरणांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काही संबंध नाही, असे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी सांगितले आहे. एसीबीच्या आदेशानुसार, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा येथील ९ प्रकल्प आणि योजनेची उघड चौकशी आणि निविदा प्रकरणांच्या फाईल्स बंद करण्याबाबत अमरावती एसीबीकडून प्राप्त अंतिम चौकशी अहवालाचे एसीबीचे महासंचालक यांनी अवलोकन केले असून या प्रकरणी उघड चौकशी भविष्यात शासनाने काही नियम अथवा न्यायालयाने काही निर्देश आणि अथवा आदेश पारित केल्यास या निर्णयाच्या अधीन राहून आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी सुरु करण्यात येईल या अटीवर या प्रकरणी चौकशी बंद करण्याचे आदेश एसीबीचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी दिले आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये अनोखी घटना! शेळीनं दारात लावलेल्या झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे वाद

Aprna

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

News Desk

विश्वास पाटील यांची सीआयडी चौकशी करणार

News Desk