HW News Marathi
Covid-19

अजित पवारांनी ‘कोव्हॅक्सिन’चा प्रकल्प विदर्भातून पुण्यात पळवला, विदर्भावर अन्याय केला !

पुणे । भाजप आमदाराने राज्यातील कोव्हॅक्सिन निर्मितीच्या प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. अजित पवारांनी विदर्भावर अन्याय केल्याचा आरोप या भाजप आमदाराने केला आहे. “भारत बायोटेक ही कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या निर्मितीसाठी नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्प सुरु करणार होती. मात्र, अजित पवार यांनी आयत्या वेळी आपले राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुण्याला पळवला”, असा आरोप पूर्व नागपूर मतदारसंघाचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

“सिरम आणि भारत बायोटेकला नागपूरच्या मिहानमध्ये लस निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, अजित पवार यांनी आयत्या वेळी राजकीय वजन वापरुन भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्यात वळवला. हा विदर्भावर अन्याय आहे. मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह अन्यही काँग्रेसचे नेते गप्प का बसून आहेत”, असा सवाल भाजपच्या कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

पुण्यातील मांजरी खुर्द परिसरात लसनिर्मिती कारखाना

पुण्यातील मांजरी खुर्द येथील कारखान्यात लसनिर्मिती करू देण्यास परवानगी देण्याचे आदेश राज्य सरकाराला द्यावेत अशी मागणी भारत बायोटेकची सहकंपनी असलेली बायोवेट या कंपनीने उच्च न्यायालयाकडे केली होती. यावर राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, “कंपनीला जीवरक्षक लसीच्या निर्मितीसाठी नक्कीच परवानगी दिली जाईल. मात्र, त्या जागेवर कायमस्वरुपी ताबा घेण्याचा विचार करु नये.” त्यानंतर आता आता मांजरी खुर्द येथील १२ हेक्टर जागेवर बायोवेट कोव्हॅक्सिन लसनिर्मितीसाठी कारखाना स्थापन करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ११,५१४ नवे रुग्ण तर १०,८५४ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk

मजुरांच्या तिकिटाचे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीतून

News Desk