HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांनी केली संजय राठोड यांची पाठराखण आणि म्हणाले…

मुंबई | राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. एकीकडे राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेला भाजप वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेना मात्र वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे. संजय राठोड यांनी मात्र अद्यापही या विषयावर मौन बाळगलं असून त्यांचं नाव समोर आल्यापासून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं असून एकाप्रकारे संजय राठोड यांची पाठराखण केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आताच्या घडीला ती व्यक्ती निराधार आहे ही वस्तुस्थिती तर खऱी आहे. मागे देखील धनंजय मुंडेंच्या बाबतीत अशाच पद्दतीचे आरोप झाले. माहिती न घेता राजीनामा घेतला असता तर त्यांची बदनामी झाली असती. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी धरायचं किवं त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे याचा विचार झाला पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

“संजय राठोड गुरुवारी खुलासा करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. माझा आणि त्यांचा काही संपर्क झाला नाही, पण त्यांच्यावर जे आरोप झाले त्याबाबत रितसर चौकशी झाली पाहिजे असं आम्ही सांगितलं आहे. पण जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तीचं नाव गेऊन त्यांना संशयाच्या भोवऱ्यात टाकणं फार उचित नाही,” असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे राठोड समोर येणार का? काय होणार या प्रकरणात पुढे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंगालमध्ये ममतांच्या विजयामागे शरद पवारांचा अदृश्य हात,राष्ट्रवादीचा दावा !

News Desk

‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपच्या मनात खोट’, खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप!

News Desk

एका नटीचा एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला – सामना

News Desk