HW News Marathi
महाराष्ट्र

“शाळेला जातो का?”, पुरग्रस्त भागाची पाहणी करताना अजित पवारांचा लहानग्यांना प्रश्न

सांगली | उपमुख्यमनातरी अजित पावर हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. भिलवडी येथील निवारा केंद्रामध्ये येऊन त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस करत त्यांचे अश्रू पुसले. तुम्हाला जेवण मिळते का? किती वर्षानंतर तुमच्या भागात पाणी भरलं? अशी ज्येष्ठांकडे विचारपूस करताना शाळेला जाता का?, अशी चौकशीही अजितदादांनी लहानग्यांची केली आहे.

अजित पवारांनी दिलं आश्वासन

अजित पवार सध्या पूर्वपरिस्थितीचा आढावा घेत आहेत. भिलवडीत प्रचंड पूर होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे. अजितदादांनी थेट या निवारा केंद्रातच जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली. निवारा केंद्रात तुम्हाला जेवण मिळतं का? केंद्रातील व्यवस्था चांगली आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसेच लहान मुलांना जवळ बोलावून तुम्ही शाळेत जाता का? अशी चौकशीही त्यांनी केली आहे.

कोल्हापूर दौरा रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज(२६ जुलै) कोल्हापूर दौऱ्याला जाणार होते. हेलिकॉप्टरनेच जाऊ अशी माहिती त्यांनी काल दिली होती, मात्र आज हवामान खराब असल्याने कोल्हापूरचा दौरा रद्द केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजित पवार आज(२६ जुलै) सकाळी ९ वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊन वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते. नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते.

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर आला आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही महापुराचा तडाखा बसला. राज्यात लाखो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं असून, पुरग्रस्त पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज (२६ जुलै) दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तर उपमुख्यमंत्री कोल्हापूर-सातारा जिल्ह्यातील भागांची पाहणी करणार होते. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्यात काहीसा बदल झाला आहे. अजित पवार कोल्हापूरऐवजी सांगलीला रवाना झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटलांचा हल्ला

News Desk

खडसेंचे मंत्रीमंडळात पुनरागमन होणार- चंद्रकांत पाटील

News Desk

भाजपविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी ED सारख्या यंत्रणांचा गैरवापर! – नाना पटोले

Aprna