HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंना अजित पवारांच्या स्टाईल मध्ये उत्तर! म्हणाले….

पुणे | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या याच शैलीत त्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोक कधी कधी काही तरी बोलून जातात, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं आहे.

कधी तरी काही लोकं असं बोलून जातात

अजित पवारांनी राज ठाकरेंना साडेत्तोड उत्तर दिलं आहे. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तोपर्यंत हा सगळा गोंधळ थांबणार नाही” – संजय राऊत

News Desk

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल, कोणतीही विध्वंसक घटना घडणार नाही! – अजित पवार

Aprna