HW News Marathi
महाराष्ट्र

“२-३ महिने शेतकरी तिथे आंदोलन करतायत, त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं, कुणी थांबवलेलं होतं?” उपमुख्यमंत्र्यांनी सेलिब्रेटिंना सुनावले

पुणे | शेतकरी आंदोलनानं देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन उग्र होत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी बोललं जाऊ लागलं आहे. पॉपस्टार सिंगर रिहानाने याबद्दल ट्विट केलं होतं. त्यावरून भारतातील कला आणि क्रीडा क्षेत्रासह अनेक नामवंतांनी ट्विट करून भूमिका मांडली होती. ट्विट करणाऱ्या सेलिब्रिंटींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सवाल करत संताप व्यक्त केला आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शेतकरी आंदोलनाबद्दल भाष्य केलं आहे.

अजित पवार म्हणाले, “देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी अहिंसेच्या माध्यमातून आंदोलन करू पाहत आहेत आणि तुम्ही उलट खिळे मारत आहात. मारले की नाही, ही काय पद्धत झाली का? त्यातच अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडतात. ते समजू शकतो. कधी कधी पाण्याचे फवारे मारतात. बॅरिकेट्स लावता. सुरक्षा लावता, हेही आम्ही समजू शकतो. पण, ३-४ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. १२-१३ बैठका होऊन चर्चा निष्पळ होते. चर्चा करून विषय संपवायला काय होतं? याचा अर्थ पुढे मागे सरकण्याची तुमची (केंद्र सरकार) मानसिकताच नाही. घेतलेला निर्णय , असा अट्टाहास आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना पटत नसेल, तर लाखांचा पोशिंदा मागणी करेलच,” असं अजित पवार म्हणाले.

“आजपर्यंत महाराष्ट्रातील किंवा देशातील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर जेव्हा अन्याय झाला, तरच आंदोलन केलं. दुधाचे भाव पडले, तरच त्यांनी आंदोलन केलं. ऊसाचे दर घसरले. केळीबद्दल काही अडचणी आल्या, सोयाबीन, कापूस यांच्याबद्दल आल्या, तरच शेतकरी रस्त्यावर येतो. त्यातून राज्यकर्त्यांनी वेळोवेळी योग्य पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे. चढउतार येतात. पण त्यातून कधी सवलत द्यायची असते, काही निर्णय घ्यायचे असतात. हे सगळं सोडून दिलं आणि खिळे मारताहेत. आता टीका व्हायला लागल्यावर काढत आहेत,” अशी टीका अजित पवारांनी मोदी सरकारवर केली आहे.

यावेळी सेलिब्रेटींच्या ट्विटबद्दल अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, “सेलिब्रेटींना माझी विनंती आहे, दोन-तीन महिने झालेत शेतकरी तिथे बसलेले आहेत. त्यावेळी का नाही काही मत व्यक्त केलं. कुणी थांबवलेलं होतं. आता बाहेरच्या कुठल्या सेलिब्रेटीला वाटलं की, इथं भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल लक्ष दिलं गेलं पाहिजे. ते त्यांचं मत आहे. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ते मत व्यक्त केल्यावर इथं कुणाकुणाला जाग यायला लागली. इथं कुणी थांबवलं होतं का? आज शेतकरी तिथे थंडी वाऱ्यात बसलेला आहे, हे दिसलं नाही. आपल्या नंदूरबारच्या भगिनीचा मृत्यू झाला. इतकी थंडी असताना तिथं कुणी गेलं नाही. लोकशाहीत चर्चा करायची असते. चर्चेतून मार्ग काढायचा असतो. पण ते काहीच त्यांनी केलं नाही. एक ट्विट झाल्यानंतर सेलिब्रेटींनी काय ट्विट केलं हेही आपण पाहिलं,” अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज्यपालांची कृती प्रश्नार्थक करता येत नाही,’ मुनगंटीवारांचा नवाब मलिकांना टोला!

News Desk

अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या की आत्महत्या? सस्पनेन्स अजूनही कायम…

News Desk

११ ऑक्टोबरची MPSC परीक्षा अनिश्चित काळासाठी रद्द, मुख्यमंत्र्यांची माहिती

News Desk