HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी साताऱ्याला रवाना

बारामती। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या(२६ जुलै) पश्चिम महाराष्ट्रात पुराची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(२५ जुलै) चिपळूणला पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अद्यापही पुराचं पाणी ओसरलं नसल्याने तिथे अजूनही पूर परिस्थिती कायम आहे.

मुख्यमंत्रयंशी चर्चा

पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्या आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. एकीकडे जिथे कोकणात पावसाचा फटका बसला आहे, तिथे दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा फटका बसला अजून दर्दी कोसळून लोकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री कोकणात गेले असून उपमुख्यंमत्री पश्चिम महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. साताऱ्यात अनेक ठिकाणी दर्दी कोसळून लोकांचा जीव गेला असून त्यांना हवी ती मदत करू असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

पाणी ओसरण्याची वाट बघत होतो

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या(२६ जुलै) पश्चिम महाराष्ट्रात पाहणी करायला जाणार असल्याचं म्हणाले आहेत. त्यावेळी ते म्हणाले,’ मीही हेलिकॉप्टरने जाणार आहे पाहणी करण्यासाठी. पाणी ओसरण्याची वाट बघत होतो. आता हळू हळू पाणी ओसरायला लागलं आहे, तर तिथे जाऊन सगळी पाहणी व्यवस्थित करून घेऊ,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

राज्य सरकार पाहिजे ती मदत करणार

पुरात झालेल्या नुकसानाचं सांत्वन करत ते म्हणाले की राज्य सरकार हवी ती मदत करायला तयार आहे. आधी पूर परिस्थितीची पागनी करू मग गरजूना हवी ती मदत राज्य सरकार करेल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. केवळ कोकणातच न्हवे तर पशिचम महाराष्ट्रात देखील बरंच नुकसान झालं असून तिथल्या ही लोकांना वेळीस मदत केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महावितरणच्या कार्यालयात संतप्त मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड 

News Desk

“मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद व निरर्थक”- अतुल भातखळकर

News Desk

नेत्यांच्या घरी झाले बाप्पा विराजमान!

News Desk