HW News Marathi
महाराष्ट्र

“मुंबईतील सर्व निर्णय ‘मातोश्री’तून, दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे”, चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई | मुंबईतील सर्व निर्णय हे मातोश्रीतून घेतले जातात. आणि दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पाटील हे आज (२५ एप्रिल) पुण्यात माध्यमांशी बोलताना, वकील गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, भाजप नेते किरीट सोमय्यांवरील हल्ला, मुंबई पोलीस आदी मुद्यांवर महाविकासआघाडी सरकारवर तोफ डागली. तसेच मुंबईत आज सर्वपक्षीय बैठकीत भाजप बहिष्कार टाकला यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केल्यावर पाटील म्हणाले, “ज्या बैठकीत काही निर्णय होणार नाही. त्या बैठकीत काय संवाद होणार आणि चहा, बिस्कटे खाली जाणार, अशा बैठकीला जाण्यात काही अर्थ नाही.” 

सर्व पक्षीय बैठकीत महाविकासआघाडी सरकारमध्ये गंभीर्या नाही. यात मुख्यमंत्री अनुपस्थित आणि राज्यात ज्यांनी ५० वर्ष राजकारण केले आणि त्यांच्या शब्दाला वजन आहे, असे नेते येणार नाहीत. मग कोण दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई कायदा सुव्यवस्थेमध्ये किंवा मुंबईमध्ये काही अधिकार आहे का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पाटील पुढे म्हणाले, “मुंबईतील जे सर्व काही निर्णय आहे, ते मातोश्रीवरून घेतले जातात. त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे आपले बिचारे आहेत. त्यामुळे ज्या बैठकीत काही निर्णय होणार नाही. त्या बैठकीत काय संवाद होणार आणि चहा, बिस्कटे खाली जाणार, अशा बैठकीला जाण्यात काही अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.” 

वकील गुणरत्न सदावर्तेंना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, या प्रश्नावर बोलताना पाटील म्हणाले, “हीच आता महाविकासआघाडीची कार्य पद्धती तयार झालेली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याकडे आपण पाहातोय. त्यांनी मातोश्री जवळ जावून हनुमान चालिसा म्हटला, गुन्हा केला. कायदा तोडला असेल झालेच नाही. त्यांनी फक्त त्यांच्या घरातून आम्ही जाणार, अशा घोषणा देत होते. यावर राजद्रोहाचा गुन्हा लागने. त्यांना नेहताना देखील असेल वाटले की, जा तुम्हाल कुठे तरी हावेला सोडतो. पण, पोलिस स्टेशनला आले पहिला एफआयआर आणि १२ तासांनंतर दुसरा एफआयआर हे सर्व सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. न्यायालय सक्षम आहे आज न्यायालयाने न्याय दिला नसेल तर मग ते पुढच्या न्यायालयात जातील. आणि सतावर्तेंच्या संदर्भात देखील सुद्धा असेच आहे. ते आता सतावर्तेंना भंडाळून सोडत आहेत. त्यांची कार्यपद्धती काय आहे हे लोकांना कळत आहे. पोटनिवडणुकांमध्ये याचे योग्य उत्तर देऊ.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा उमेदवार हरला तरी पर्वा नाही ! पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं विधान

News Desk

‘मुंबई हिंदुस्तान है’ रितेश देशमुखचं कंगणा राणावतला सणसणीत उत्तर!

News Desk

लवकरच पेंग्विन ह्या केस मध्ये सापडणार, निलेश राणेंचा पुन्हा प्रहार

News Desk