HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोनाचे नियम पाळत ग्रामसभा घेण्यास परवानगी द्या’, शिवसेना खासदाराची राज्य सरकारकडे मागणी!

नांदेड। ग्रामीण भागात विकासाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची असून ग्रामसभा घेण्यासाठी राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने शासकीय किंवा निमशासकीय सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास निर्बंध आणले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ग्रामसभा घेणे सुद्धा बंद करण्यात आले होते. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास काही प्रमाणात कमी झाला आहे म्हणून आता शिवसेनेच्या खासदाराने मुख्यमंत्र्यांकडे ग्रामसभा घेऊ देण्याची मागणी केली.

विकासात्मक कामे खोळंबली आहेत

ग्राम विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्वाची आहे, असं सांगत ग्रामपंचायत कोरोनाचे नियम पाळतील, पण त्यांना ग्रामसभा घेण्याची परवानगी द्या, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षापासून ग्रामसभा घेणं सुद्धा बंद करण्यात आले होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत DPR बनविण्याचे काम, 15 व्या वित्त आयोगातील आराखडे तयार करणे, गावातील नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, रोजगार हमी योजना कामाच्या निवडीचे लेबर व बजेट मंजुरी वनहक्क दावे मंजूर करणे, यासह इतर विकासात्मक कामे खोळंबली आहेत.

त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामसभा या राज्य शासनाच्या नियमानुसार आणि कोरोनाचे नियम पाळून घेण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभा घेऊन देण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांची ओबीसी आरक्षणाची मागणी आणि अजित पवारांनी लगेचच बोलावली बैठक

News Desk

दवाखाना इमारतीवर जिल्हा परिषद उमेदवाराचे जाहिराती

News Desk

सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

Aprna