HW News Marathi
महाराष्ट्र

अमरिंदर सिंग होणार देशाचे नवे कृषीमंत्री? नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता!


नवी दिल्ली। पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या खांद्यावर केंद्र सरकार मोठी जबाबदारी टाकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. काँग्रेसचे नेते असणाऱ्या अमरिंदर सिंग यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच भाजपाच्या एका नेत्याबरोबरच पंबाजमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिरोमणी अकाली दलच्या नेत्यांनी याचसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बुधवारी भेट घेतल्यानंतर शिरोमणी दलाकडूनही अमरिंदर सिंग यांच्या गळ्यात केंद्रीय कृषीमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केलीय. रिपब्लिक टीव्हीशी बोलताना शिरोमणी दलाचे नेते महेशिंदर सिंग गरेवाल यांनी अमरिंदर सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री बनवण्यात येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचा उल्लेख केलाय.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अमरिंदर सिंग आपलं राजकीय भविष्य ठरवतील

अमरिंदर सिंग यांच्यासारखा वरिष्ठ राजकारणी हा नेहमीच आपले मार्ग स्वत: निवडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी आहेत. २०२२ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन अमरिंदर सिंग आपलं राजकीय भविष्य ठरवतील असंही त्यांनी म्हटलं आहे. “केंद्रीय गृहमंत्री आणि कॅप्टन (अमरिंदर सिंग) यांच्यादरम्यान काहीतरी समझोता झाल्याची चर्चा मागील वर्षभरापासून राजकीय वर्तुळात आहे. तसेच याच चर्चांनुसार अमरिंदर सिंग यांना भारताचं कृषीमंत्रीही बनवलं जाण्याची शक्यत आहे. तुम्ही राजकारणामध्ये कोणतीही शक्यता नाकारु शकत नाही,” असं गरेवाल यांनी म्हटलं आहे.

पंजाबमध्ये मोठे बदल पहायला मिळतील

खरोखरच अमरिंदर सिंग भाजपामध्ये गेले आणि केंद्रीय कृषी मंत्री झाले तर शिरोमणी दलची भूमिका काय असेल या प्रश्नावर गरेवाल यांनी कृषी कायद्यांमध्ये काही बदल करता येतोय का यासंदर्भातील शक्यता आम्ही पडताळून पाहू असं म्हटलं आहे. “कृषी कायद्यांसंदर्भात अकाली दलची भूमिका कायमच भाजपाच्या भूमिकेच्या विरोधात राहिली आहे. अमरिंदर सिंग हे कृषी कायद्यांमध्ये बदल घडवण्यासाठी भाजपा सरकारला भाग पाडतील अशीही चर्चा आहे. मात्र असं झाल्यास आमच्या भाजपा सोबतच्या युतीचं काय होणार हा भविष्यातील चर्चेचा विषय आहे. सध्या तरी मी इतकं सांगू शकतो की २०२२ च्या राज्यातील विधानसभा निवडणुकांआधी पंजाबमध्ये मोठे बदल पहायला मिळतील,” असं गरेवाल म्हणाले आहेत.

अमरिंदर सिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट गेणार असून या भेटीनंतर त्यांना देशाचं कृषीमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता भाजपाचे नेते हरजीत गरेवाल यांनी व्यक्त केलीय. कॅप्टन अमरिंदर यांना त्यांची भूमिका स्वत: ठरवावी लागणार आहे. त्यांच्यासाठी ती इतर कोणी ठरवू शकत नाही. मोदींना चांगल्या लोकांवर जबाबदारी टाकायलं आवडतं असंही या नेत्याने म्हटलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करुणा शर्माच्या गाडीत ठेवलेल्या पिस्तुलाबद्ल भाजप नेते काय म्हणाले?

News Desk

सेना-भाजप विधानपरिषदेची निवडणूक एकत्र लढवणार

swarit

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक!

News Desk