HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका !

नवी दिल्ली | “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका,” असल्याचे विधान प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल (१६ जुलै) लोकसभेत केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे कोल्हे सभागृहात म्हणाले. शिवरायांनी शेतकऱ्यासाठी जशी धोरणे आखली होती त्याचप्रमाणे सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी कोल्हेंनी लोकसभेत केली आहे.

अमोल कोल्हे यांनी लोकसभेत म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका,’ असे शिवाजी महाराजांनी सांगितले होते. शेतकऱ्यांसंदर्भात हाच आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनी करावा, अशी अपेक्षा केली आहे. शेतीसंदर्भातील प्रश्नांवर काहीतरी ठोस उपाययोजना केल्या जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना कोल्हे यांनी ‘दरवेळी प्रश्न उत्तराच्या तासात शेतीसंदर्भात प्रश्न विचारले जातात. तेव्हा दरवेळी शेतकऱ्यांना सहा हजार दिले जातील असेच उत्तर दिले जाते. मात्र आज शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये रोजगार मिळतो. हे १७ रुपये म्हणजे त्यांचा सन्मान आणि की चेष्ठा हेच कळत नाही. तसेच सहा हजार वर्षाला दिले तरी ५०० रुपये महिना हा हिशेबाने घर चालवता येते का? ५०० रुपये महिना दिल्यास शेतीची देखभाल करणे शक्य आहे का? असे अनेक सवाल देखील कोल्हे यांनी लोकसभेत उपस्थित केले.

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी

कोल्हे यांनी पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती सुरू करण्याची मागणी केली. बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी २०१४ च्या मध्यात राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. याच मुद्द्यावर कोल्हे यांनी लोकसभेमध्ये बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याची अप्रत्यक्ष मागणी केली. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून ग्रामीण भागात परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल असं मत कोल्हे यांनी लोकसभेत मांडले. ‘बैलगाडा शर्यतीसाठी लागणारे खिलारी बैलांची पैदास ही दुष्काळग्रस्त क्षेत्रात होते. हे बैल पश्चिम महाराष्ट्रात विकले जातात. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही या ग्रामीण भागाकडे आकर्षित करता येईल,’ असं कोल्हे लोकसभेत बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, शिवसेनेकडून आली प्रतिक्रिया

News Desk

जयसिंगराव गायकवाड उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करत हाती घड्याळ बांधणार

News Desk

हजारो कोटींचा घोटाळाकरून पळालेल्या नीरवमोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

News Desk