HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर शरद पवारांचा हात, त्यामुळेच ते मुख्यमंत्री – अमोल कोल्हे

पुणे | ठाकरे सरकारमधील नेत्यांमध्ये वाद नाही असं पक्षश्रेष्ठी सांगत असले तरी काही उदाहरण वारंवार विचार करण्यास भाग पाडत आहेत.  याचंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानाने हा वाद समोर आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाद सुरु आहे. हा वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. हा वाद एवढा शिगेला पोहचलाय की मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं. त्यामुळे आता या दोघांमधला वाद सरकारवर परिणाम करतो का याची चर्चा सुरू झाली आहे.

 ठाकरे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवारांचा आशीर्वाद

कार्यक्रमाच्या उदघाटनाच्या वेळेस अमोल कोल्हे यांनी एक विधान केलं आहे ज्यामुळे आता पुन्हा महाविकासआघाडी पक्षांमध्ये वाद सुरु होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ‘मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे’, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला. अमोल कोल्हेंच्या या ‘सिधी बात’ मुळे शिरुरमधील वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज (१७ जुलै) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच (१६ जुलै) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम

खासदार आढळरावांनी यांनी काल उद्धघाटनाच्या वेळी आपलं मत व्यक्त केलं आहे. खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते. त्यावेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे. अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री गावितांनी निवडणूक आयोगापासून लपविली माहिती

News Desk

उदयनराजे भोसलेंचे भाजपत योगदान किती?, संजय काकडेंचा सवाल

swarit

गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार! –  दादाजी भुसे

Aprna