HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणांची भायखळा कारागृहातून सुटका; प्रकृती खालावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने काल जामीन मंजूर केला आहे. तब्बल १२ दिवसांनंतर राणा दाम्पत्यांना तरुंगातून बाहेर आले आहेत. नवनीत राणांना आज (५ मे) भायखळा तरुंगातून सुटका झाली असून नवनीत राणांना स्पाँडिलायसिसचा आजार असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. राणा दाम्पत्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर बलण्यास बंदी घातली असून या अटी शर्तींसह न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्यांना ५० हजाराच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांवर राजद्रोह गुन्हा अंतर्गत त्यांना अटक केले होते. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २ मो रोजी निकाल लिहून पूर्ण न झाल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने आज (४ मे) निकाल राखून ठेवला होता. सध्या रवी राणा यांच्या १७ तर नवनीत राणा यांच्या ७ गुन्हे दाखल झाले आहे. सध्या नवनीत राणा भायखळा कारागृहात तर रवी राणा तळोजा कारागृहात ठेवले आहे. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा त्यांना नाट्यानंतर पोलिसांनी २३ एप्रिल अटक केले होते. राणा दाम्पत्याना वांद्रे न्यायालयाने २४ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

नेमके काय आहे प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी २३ एप्रिलला रोजी हनुमान चालिसा पठाण करण्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यानी अमरावती पोलिसांनी हुलकावणी देऊन एक दिवस आधी मुंबई दाखल झाले होते. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी मातोश्री समोर ठिय्या आंदोलन केले. तर काही शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार मधील घरासमोर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आणि राणा दाम्पत्याना त्यांच्या घरात थांबविले. दरम्यान, राणा दाम्पत्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौ-याचे पाश्वभूमीवर कारण सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी जावून हनुमान चालिसा पठाण करण्याचा निर्णय मागे घेतला व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला. यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याना राजद्रोहाच्या गुन्हा अंतर्गत अटक केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करता? राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

News Desk

करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे… – कंगना रणावत

News Desk

केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये कुणाचाही हस्तक्षेप न होता, पारदर्शकपणे कारवाई केल्यास विरोध नाही! – अजित पवार

Aprna