HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा अमृता फडणवीसांची ठाकरेंवर विखारी टीका”

मुंबई। महाविकास आघाडी सरकारचा अर्थातच ठाकरे सरकारने आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. त्यावरुन महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप मालिका सुरु झालेली बघायला मिळते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आदी नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. आता यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.

अमृता यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. ‘महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा’, अशा विखारी शब्दात अमृता यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीये.

चंद्रकांत पाटील यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली. यापार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर विविध निर्णय आणि मुद्द्यावरून हल्लाबोल केला आहे.दोन वर्षांपासून आघाडी सरकारचे फक्त पैसे कमवायचे धंदे सुरू आहे, अशी टीका पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निशाणा साधला.

संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात

तर दुसरीकडे प्रकाश जावडेकर यांनीही ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कामवार टीका केलीय. प्रकाश जावडेकर यांनी उद्धव ठाकरेंना अपघातानं झालेले मुख्यमंत्री म्हणत टीकास्त्र सोडलंय. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात जावडेकरांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना जोरदार रंगू लागलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हेगारांच्या गराड्यात,औरंगाबाद दौऱ्याचा एक फोटो झाला वायरल

News Desk

शेतकरी कन्यांचे पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन

News Desk

आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार! – एकनाथ शिंदे

Aprna