HW News Marathi
महाराष्ट्र

“मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?” अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला टोमणा

मुंबई | मुंबईत मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरू आहे. या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्गच्या जागेवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. आशिष शेलार यांच्या टीकेचा व्हिडीओ रिट्विट करत अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

“मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?”, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून कांजूरमार्ग येथील त्या जागेवर बोर्ड देखील लावण्यात आला आहे. आता नेमकी यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या बंडखोर माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

BMC च्या रुग्णालयातील मलीन कपडे धुण्याबाबत भ्रष्टचार, भाजप आमदार अमित साटमांचा आरोप

Aprna