HW News Marathi
महाराष्ट्र

“दादा तुम्ही शब्द दिला होता, त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं प्रशासन?”, गावकऱ्यांचा फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना सवाल

कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज(३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. हा रोष ठाकरे सरकारविरोधातील नव्हता तर थेट फडणवीस सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्याचा होता. यावेळी ग्रामस्थांनी थेट फडणवीसांनाच खडेबोल सुनावले आहे.

दादा तुम्ही शब्द दिला होता

देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना संतप्त ग्रामस्थांनी त्यांना कटू सवाल विचारला आहे. खिडकीबाहेरून एका व्यक्तिने पोटतिडकीने बोलायला सुरुवात केली. त्याचा संताप, मनातील खदखद हा व्यक्ती व्यक्त करत होता. साहेब, मागच्या टायमाला चंद्रकांतदादा आलते. दादांनी पण शब्द दिलता. नाही म्हणत नाही, दादा तुम्ही शब्द दिला होता याच मंदिरात… मारुती साक्षय आमचा… त्याच्यानंतर दोन वर्षे कुठं गेलं वो प्रशासन?, असा संताप या ग्रामस्थाने व्यक्त केला आहे.

कुणीच बघितलं नाही आमच्याकडे दोन वर्षे…

कोल्हापूरच्या नागरिकांनी गेल्या वर्षी पुराचा सामना केला आहे. याहीवर्षी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौरा केला असताना लोकांनी त्यांना प्रश्न विचारून भांबावून सोडलं आहे. त्यानंतर तुम्ही आम्हाला बघितलं नाही. आदित्य ठाकरे साहेब आलते त्यांनी बघितल नाही. कुणीच बघितलं नाही आमच्याकडे दोन वर्षे… आणि आज तुम्ही परत आलाय इथं… आसचं आता तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही साहेब, हे मी आता तुम्हाला उघड इथेच सांगतो, अशी वेदनाही या ग्रामस्थाने बोलून दाखवली. त्यामुळे फडणवीस आणि पाटीलही काळ स्तब्ध झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरजच नाही”, भाजप नेत्याचा अजब तर्क

News Desk

अहेरी शहरातील सुसज्ज बाजारवाडीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk