HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी अनिल परबांचे आवाहन

रत्नागिरी | कर्मचारी कधीच पगारपासून वंचित राहिलेला नाही. अहमदनगर येथे घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले अहमदनगरमधील शेवगाव येथील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. आज सकाळी त्यांच्या नातेवाईकांशी बोलणे झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. यावेळी ते म्हणाले, शासनाकडून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत देऊ. आतापर्यंत 2600 कोटी आणि काल जाहील केलेले 122 कोटी इतका निधी शासनाकडून मंजूर करुन कर्मचाऱ्यांचे पगार दिले आहेत. मला या गोष्टीची जाणीव आहे की, पगार द्यायला थोडासा उशीर होतो. परंतु त्यांचे प्रत्येकवेळी पगार दिले आहेत. कर्मचारी कधीच पगारपासून वंचित राहिलेला नाही.

सटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला थोडासा उशीर होतो, परंतु यापुढे प्रत्येकवेळी मी त्यांचा पगार देतो आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. आज रत्नागिरी येथे बोलत होते. पुढे ते म्हणाले, या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की, एसटी रुळावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. काल पूर्ण दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेबरोबर बसून चर्चा केली आहे. 2018 पासून प्रलंबित असणाऱ्या सर्व मागण्या याशिवाय एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

या मागण्या पूर्णपणे मान्य करण्याचे आश्वासनही अनिल परब यांनी दिले आहे. महागाई भत्तासंदर्भात 12 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत जाहीर केला आहे. हा टक्का राज्य शासनाच्या बरोबरीने देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात आपण सकारात्मक असून दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री ॲड. परब यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू दौऱ्यावर, आजोबांचा सल्ला फडणवीस आणि राज्यपालांसाठी?”

News Desk

Maratha Reservation :“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक , गरज पडल्यास एकदिवसीय अधिवेशन बोलावणार !”

News Desk

संकटाचा सामना करण्याचा सरकारला अनुभव – शरद पवार

News Desk