HW News Marathi
महाराष्ट्र

महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, अनिल परबांचा फडणवीसांना टोला 

मुंबई | आजपर्यंत मुंबई महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, असे वक्तव्य करुन शिवसेना नेते अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. मुंबईची जनता शिवसेनेवर प्रेम करते. मुंबईतील चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना ठामपणे लोकांसाठी उभी राहिली आहे. त्यामुळे आजपर्यंत मुंबईकरांनी कधीही शिवसेनेची साथ कधीही सोडलेली नाही, असे अनिल परब यांनी सांगितले आहे.

भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची काल (१८ नोव्हेंबर) दादर येथे बैठक पार पडली. यावेळी मुंबई महागरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आणि पालिकेत भाजपचा महापौर बसवायचा, असा निर्धार भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. मुंबईची जनता शिवसेनेवर प्रेम करते. यापूर्वीही भाजपसारखे अनेकजण आले आणि गेलेही. कोणाला साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला ठाऊक आहे. निवडणुका जवळच आहेत तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केली होती. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. २०२२ साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादच्या नामांतरावरुन मराठा समाज आक्रमक, बाळासाहेब थोरातांच्या फोटोला मारले जोडे

News Desk

#CoronaVirus : मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचे ऐका, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

swarit

फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीतही काही अधिकारी सामील असतीलच ! सामनातून प्रहार…

News Desk