HW News Marathi
महाराष्ट्र

नांदगावच्या सेना आमदाराची भुजबळांशी खडाजंगी, त्यानंतर शिवसेनेची येवला मतदारसंघावर भगवा फडकवण्याची घोषणा!

नाशिक। राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव तहसील कार्यालयात खडाजंगी झाली होती. छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात आज दिलजमाई झाली सुद्धा मात्र, दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून नियोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली. यावेळी पुढील निवडणुकीत येवला विधासभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवायचा निश्चय शिवसैनिकांनी केला. त्यासाठी कामाला लागण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आता छगन भुजबळ यांच्या समोर शिवसेनेकडून आव्हान उभे केले जाणार का असा प्रश्न यानिमिताने उपस्थित केला जातोय.

पुढील निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येणाऱ्या दिवसात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता संवाद मेळावाचे आयोजित नाशिक जिल्ह्यात करण्यात आले. येवल्यातून संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की पुढील निवडणुकीत भगवा झेंडा फडकवायचा आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे ,माजी आमदार कल्याणराव पाटील ,स्थानिक नेते संभाजी पवार यांनीही आम्ही तयार आल्याचे सांगितल्याने भुजबळ यांच्या समोर शिवसेनेकडून येणाऱ्या निवडणुकीत मोठे आव्हान उभे केले जाणार असल्याचे चित्र या मेळाव्यातून दिसून आले

सुहास कांदे यांना छगन भुजबळ यांनीही त्याच पद्धतीने उत्तर देत सुनावलं होत..

काल नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यात आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती. सुहास कांदे यांना छगन भुजबळ यांनीही त्याच पद्धतीने उत्तर देत सुनावलं होत..मात्र आज भुजबळ आणि कांदे यांच्यात जिल्हाधिकारी कार्यलयात बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे ही उपस्थित होते. पत्रकार परिषदेत भुजबळांच्या शेजारी बसलेल्या सुहास कांदे यांना जेव्हा माध्यमानी विचारलं असता आता कलगीतुरा थांबवा अस म्हणत भुजबळांनीच वादावर पडदा टाकला. त्यामुळे काल झालेली खडाजंगी आज मात्र शांत झाली..भुजबळांनीच संयमाची भूमिका घेत..तुमच्या आपत्कालीन निधी संदर्भात पुढे पाठपुरावा करू अस सांगत अखेर वाद शांत झाला. काल झालेल्या या बाचाबाचिची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होती..भुजबळ कांदे आमने सामने आल्याने अनेक राजकीय चर्चा देखील रंगल्या होत्या..मात्र आज त्या चर्चना पूर्णविराम मिळाला..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

Aprna

निजामुद्दीन येथे झालेला प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही

News Desk

यशवंत सिन्हांची सीएए, एनआरसीविरोधात ‘गांधी शांती यात्रा’

swarit