HW News Marathi
महाराष्ट्र

अर्णब गोस्वामी यांना यूके’च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला

नवी दिल्ली | ‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक भारत’ या हिंदी वृत्तवाहिनीला ‘यूके’च्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाखांचा दंड ठोठावला आहे. पाकिस्तानी लोकांबद्दल द्वेष आणि प्रचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम यापुढे वाहिनीवर चालवले जाणार नाहीत याची लेखी हमी देखील देण्याचे आदेश ‘रिपब्लिक’ला देण्यात आले आहेत.

यूके’मधील हिंदी भाषिकांपर्यंत ‘रिपब्लिक भारत’ वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या ‘वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क’ला ‘यूके’च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या ‘पूछता है भारत’ या टीव्ही शोमध्ये ६ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या चर्चेबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोस्वामी यांच्याकडून पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात समाजात द्वेष पसविण्याचं काम केल्याचं ‘ऑफकॉम’ने म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या नियमांचा फज्जा ! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

News Desk

आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळला

News Desk

बीडमध्ये अतिरिक्त ऊसाचा पहिला बळी; संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून ऊसाच्या शेतामध्ये केली आत्महत्या

Aprna