HW News Marathi
महाराष्ट्र

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लातूर-सीएसटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देखील मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन बदलापूर-अंबरनाथमध्ये बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथच्या लोकल ट्रेनला फटका बसला आहे. 

२२१०८ लातूर-सीएसटी एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे आज (३० मार्च) ७ वाजताच्या सुमारा इंजिन बंद पडले आहे. यामुळे कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथच्या लोक सेवेवर परिणाम पडला आहे. त्यामुळे चाकरमाम्यांना मोठा त्रास सहन करावा लाणार आहे. 

 मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करून रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती दिली आहे. शिवाजी सुतार यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “२२१०८ लातूर-सीएसटी येणारी ऐक्स्प्रस ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती गाडी बदलापूर-अंबरनाथ दरम्यान थांबली आहे. दरम्यान, आज सकाळी ७.०५ नंतर कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ येथून येणाऱ्या असून लोकल ट्रेन कल्याण सीएसएमटीकडे जाणाऱ्या ट्रेनवर परिणाम झाला आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna

बांधकामावर राबणाऱ्या जीवांचे काहीच मोल नाही का?

News Desk

जयश्री जाधव यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

Aprna