HW News Marathi
महाराष्ट्र

एकमेकांविरोधात कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरू नका आशीष शेलारांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई । महाविकास आघाडीत काहीतरी शिजत असल्याचे बोललं जातंय, आणि याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीतरी शिजत असल्याचा संशय राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अधिकच चर्चा रंगू लागली.

महाविकास आघाडी सरकार मध्ये कुरघोड्या होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी या राजकीय भेटीगाठींवरून केला आहे. तुम्ही एकमेकांविरोधात खुशाल कुरघोड्या करा मात्र जनतेला वेठीस धरु नका अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावेळी महाविकास आघाडीत सुरु असलेल्या नाटकीय भेटीगाठींवर परखड टीका केली आहे.

शेलार यांनी म्हटलं आहे की, खरं तर तीन पक्ष मिळून एकमेकांशी काय कुरघोड्या करत आहेत याच रोज सर्वसामान्यांपुढे प्रदर्शन आहे. ३ पक्ष मिळून एकमेकांविरोधात कुरघोड्या करु देत त्याच्यावर काही म्हणणं नाही. जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि बिमोड करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, आज सामान्यांचा रोजगार बुडतो आहे. रोजगार व्यावसायासाठी जाताना अडवण्यात येत आहे. या सगळ्यातन जी कुचंबना सामान्य माणसाला स्वतःच घर परिवार चालवण्याची आहे. त्याचा विचार करावा अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आणि ट्विट करत आशिष शेलार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत केली – देवेंद्र फडणवीस

News Desk

चौकशीतून जे समोर येईल, ते बघा…; संजय राठोडांनी सोडलं मौन

News Desk

महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna