HW News Marathi
महाराष्ट्र

“चूक नसलेल्यांना शिक्षा केली, तर काय करायचं?”, शेलारांचा शरद पवारांना सवाल

सातारा। महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षामध्ये नेहमीच कुरगोडही सुरु असते. यात भर म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजपच्या १२ आमदारांना निलंबनाची. नीलम्बित झालेले भाजप नेते आशिष शेलार यांनी आपला मत आता व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी नजर कैदेत ठेवले आहे. त्यावरुन शेलार यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजप आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चूक असेल तर शिक्षा होईल, असे म्हटले आहे, यावर शेलार म्हणाले, पवार साहेबांच्या वाक्याचे आम्ही समर्थन करतो. पण चूक नसताना शिक्षा झाली तर काय करणार पवार साहेब, तसेच चूक नसलेल्यांना शिक्षा केली. तर काय करायचे पवार साहेब, याचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यावे, असेही शेलार म्हणाले.

भाजप पक्षात नाराजीचा कोणताही विषय नाही

केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक भाजप नेत्यांना डच्चू देऊन नवोदीत चेहऱ्यानं संधी दिली गेली आहे. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नाही, याविषयी विचारले असता आमदार आशिष शेलार म्हणाले, उदयनराजे आमचे नेते आहेत. भाजप पक्षात नाराजीचा कोणताही विषय नाही. नव्या मंत्र्यांची यादी सर्वमान्य आहे, त्यामुळे याविषयी मी अधिक बोलू शकत, नसल्याचे शेलार यांनी सांगितले आहे.

कर नाही त्याला डर कशाला

महाविकासआघाडीच्या नेत्यांवर सध्या ईडीचं सावट आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘कर नाही त्याला डर कशाला’ त्यांनी आपली बाजू मांडावी. प्रत्येक गोष्टीत बचावासाठी राजकारण. चौकशी आली की राजकारण करायचे मग चौकशी यंत्रणानी काम करायचे की नाही? चौकशी लागली की पक्ष पुढे करून राजकारण करून चौकशी बंद करायची, असे राज्य चालवायचे का, असा सवाल उपस्थित करून शेलार म्हणाले, यामध्ये कोणी राजकारण आणू नये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

News Desk

…आता सर्व विद्यापीठ पदवी वितरण घोटाळ्याचे महाकाव्य केंद्र बनतील! – देवेंद्र फडणवीस

Aprna

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna