HW News Marathi
महाराष्ट्र

“हळूहळू संजय राऊत खरं बोलायला लागलेत पण…”, आशिष शेलारांचा टोला

मुंबई | बेळगाव महानगपालिका निवडणूक नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाने बाजी मारली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर टीकाटिप्पणी तर केलीच मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत यांना शेलक्या शब्दांत टोलाही लगावला आहे.

संजय राऊत अगोदर खरं बोलले

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी हे मत दिलं आहे. “बेळगावचे नेते, जनता आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. या प्रकरणात शिवसेनेचे संजय राऊत अगोदर खरं बोलले असं मी म्हणेन. ते म्हणाले होते की बेळगावात भगवा फडकेल. खरा भगवा भाजपाकडेच आहे हे आता स्पष्ट झालंय. एवढीच प्रतिक्रिया देईन”, असं शेलार म्हणाले आहेत.

मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात

सामन्यातल्या अग्रलेखात हिंदुत्वाविषयी केलेल्या भाष्याबद्दल विचारलं असता शेलार म्हणाले, “मी आत्ताच म्हणालो की संजय राऊत हळूहळू खरं बोलायला लागले असतील. पण कधीकधी आपल्या मित्रपक्षांच्या मालकांना खूश करायला थोडा यूटर्न घेतात. आणि त्या यूटर्नमध्ये शिवसेना आता हिंदुत्वापासून सरकली हे लपवण्याचा अतिशय काटोकाट प्रयत्न संजयराऊत करत आहेत. टिपू सुलतान जयंतीपासून बेहराम पाड्यात जिंकण्यापर्यंत, गोविंदांवर केसेस टाकण्यापासून गणेशोत्सव आणि मंदिरांच्या बंदीपर्यंत जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अपेक्षित आहे तेच शिवसेना करत आहे. आणि म्हणून आपल्या मनगटातून आणि हातातून भगवा सरकला हे जाणवल्यावर अजून आम्ही आहोत हे दाखवण्याचा त्यांचा वायफळ प्रयत्न आहे”.

कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपाने ३६ जागा मिळवत बहुतमतात असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे. यावरुनच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच, मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगाव पालिकेवर छत्रपती हंसिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे. मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी मंत्री संजय राठोड पुन्हा आले चर्चेत..नेमकं काय झालं ?

News Desk

‘बेबी पेंग्विन’ ने त्रास होत असेल तर ‘वाघ’ म्हणा म्हणजे घराबाहेर पडतील,भाजपचा आदित्यंना टोला

News Desk

अजित पवारांनी रोहित पवारांना भर सभेत खडसावल, ”अरे शहाण्या… तू आमदार आहेस”

News Desk