HW News Marathi
महाराष्ट्र

देवभुमीतून आलेल्या राज्यपालांकडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र मिळत असेल तर ती काळाची गरज आहे! 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे का असा प्रश्न राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरु करण्याबाबतच्या पत्रात उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी ठाकरे भाषेत मला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याच्या गरज नाही असे उत्तर दिले होते. त्यावरुन आता राजकारण तापले आहे. भापजपच्या नेत्यांकडून याचा कडाडून विरोध केला जात आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचे प्रमाणपत्र देण्याच्या गरज आहे असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्राची गरज आहे असे म्हटले आहे.

“तुम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घेण्याची वेळ आली आहे. याचे कारण हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून तुम्ही केव्हाच प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारतां येणार नाही की ज्यावेळी मुंबई आणि भारतावर हल्ला झाला, याकुबला फाशी झाली. त्यावेळेस त्याच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याऱ्यांना तुम्ही मांडीवर घेऊन बसला आहात. तर कसाबने ज्यांना बिर्याणी खायला घातली त्यांच्याशी संगनमत तुम्ही केले आहे. तर ज्यावेळी तुम्ही पंढरपुरला गेला होतात त्यावेळी विठूरायाच्या चरणालाही तुम्ही स्पर्श केला नाही, हे सर्व तुम्हाला नाकारतां येणार नाही. आणि त्यामुळे तुमचं हिंदुत्व भेसळ झाले आहे. आणि तुम्हाला प्रमाणपत्राची गरज आहे आणि ते प्रमाणपत्र देवभूमीतून आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मिळत असेल तर ती काळाची गरज आहे”, असे शेलार यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ST कर्मचाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपलं नुकसान करून घेऊ नये!” परबांची विनंती

News Desk

इंदोरीकर महाराजांनी वकिलामार्फत पीसीपीएनडीटी नोटीशीला दिले उत्तर

News Desk

‘….पण मला शहाण्या माणसाने सांगितलं आहे पुण्यात जास्त बोलू नये’, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात!

News Desk